Category

Show more

आर्थिक विकासाचे सिध्दांत १ ( Theories of Economic Development )

आर्थिक विकासाचे सिध्दांत १( Theories of Economic Development - 

अॅडम स्मिथच्या आर्थिक विकासाच्या सिध्दांताचे टीकात्मक परिक्षण करा.

प्रास्ताविक : - दुसऱ्या महायुध्दामुळे अनेक राष्ट्रांतील पायाभूत सुविधा उध्वस्त होवून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते . यातून अर्थव्यवस्थेला सावरून विकासाचा वेग वाढविणे आवश्यक होते . त्यामुळे अनेक अर्थशास्त्रज्ञांनी आर्थिक विकासाचे सिध्दांत मांडले . आर्थिक विकास म्हणजे देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात वाढ घडवून आणणे होय . म्हणजे देशातील नैसर्गीक साधन सामग्री , भांडवल व मानवी साधने यांच्या साह्याने अर्थव्यवस्थेत संख्यात्मक व गुणात्मक बदल घडवून आणणे होय . हे बदल कशा पध्दतीने होते . लोकांच्या राहणीमानात कशी वाढ होते , अर्थव्यवस्था विकासाकडे कशी वाटचाल करते याविषयी अनेक अर्थतज्ञांनी आर्थिक विकासाच्या सिध्दांताची मांडणी केली आहे . 

अभिमतपंतीयाचा विकासाचा सिध्दांत ( Classical Theories of Development )

 अॅडम स्मिथ यांना अभिमत पंतांचे ( सनातनवादी ) संस्थापक मानले जाते . त्यांनी आपले आर्थिक विचार ' आशावाद ' , ' निसर्गवाद ' व ' आदर्श हात ' यांच्या साह्याने मांडले . अॅडम स्मिथ नंतर त्यांचे अनुयायी रिकार्डो , जॉन स्टुअर्ट मिल , माल्थस , पीगू यांनी त्यांची विचार परंपरा पुढे चालू ठेवली . त्यामुळे या सर्वांना अभिमतपंतीय व त्यांच्या विचाराला सनातनवादी विचार असे म्हणतात . यातील प्रमुख अॅडम स्मिथ , रिकार्डो व माल्थस यांच्या आर्थिक विकासाच्या सिध्दांताचे विवेचन केले आहे.

अॅडम स्मिथ यांचा आर्थिक विकासाचा सिध्दांत 

 अॅडम स्मिथ यांनी आपल्या ' An Enquiry into the Nature . and causes of Wealth of Nation ' या १७७६ मध्ये प्रकाशित केलेल्या ग्रंथात आर्थिक विचार मांडले आहेत . अॅडम स्मिथ यांनी आर्थिक विकासाचा स्वतंत्र असा सिध्दांत कोठेच मांडला नाही . त्यांच्या आर्थिक विचारातच आर्थिक विकासाचे विवेचन मिळते . त्यामुळे त्यांचा सिध्दांत खालील प्रमुख घटकांद्वारे सांगता येतो.

  ( 1 ) Frenfare a strenare ( Naturalism and optimism ) -

 ' अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे त्यामुळे संपत्ती निर्माण करण्याची प्रेरणा व्यक्तीमध्ये मुळातच असते . व्यक्तीला स्वहित कशात आहे हे निसर्गतः समजते . त्यामुळे व्यक्तीहित व समाजहित एकदाच साधले जाते . हे सर्व निसर्गतःच ' अदृश्य हात ' करते . त्यामुळे आर्थिक विकास आपोआप घडून येतो . 

( २ ) निर्हस्तक्षेपाचे धोरण ( Laissez Faire policy ) - 

अॅडम स्मिथ यांच्या मते , मनुष्य मुळातच स्वार्थी आहे . त्यामुळे त्याला स्वतःचे हित कशात आहे हे समजते . म्हणून सरकारने निर्हस्तक्षेपाचे धोरण स्वीकारावे . जर सरकारने हस्तक्षेप केला तर मानवाचे कल्याण होण्याऐवजी अकल्याणच अधिक होते . त्यामुळे सरकारने ठरावीक व अत्यंत महत्वाची कार्ये स्वतःकडे ठेवून अन्य कार्यासाठी बाजारयंत्रणेला पूर्ण स्वातंत्र्य द्यावे . यालाच स्मिथचे निर्हस्तक्षेपाचे धोरण असे म्हणतात . अॅडमस्मिथ यांनी आर्थिक विकास विषयक प्रतिमान मांडत असतांना निर्हस्तक्षेपाचे तत्व प्रभावीपणे मांडण्याचे कार्य केले . कारण त्यांच्या मनावर नैसर्गिक नियमाच्या तत्वाचा प्रभाव पडला होता . निसर्गाच्या नियमावर विश्वास होता . निर्हस्तक्षेपाचे तत्व त्रिकालाबाधीत सत्य आहे . असे स्मिथमचे मत होते.
             निसर्गाच्या नियमानुसार प्रत्येक व्यक्तिला आपले हित कशामध्ये आहे हे समजू शकते . त्यामुळे प्रत्येकाला स्वतःचे हित साध्य करण्यासाठी परवानगी दिली पाहिजे . कारण व्यक्तीचे हित हेच समाजाचे हित असते . व्यक्तीचा विकास झाला म्हणजे सामाजिक हितासाठी वेगळी धडपड किंवा प्रयत्न करण्याची कांहीच गरज नसते . व्यक्तीला स्वातंत्र्य दिले म्हणजे आपणास लागेल तेवढी संपत्ती तो आपोआपच निर्माण करेल . त्यातून समाजाची संपत्ती वाढेल , त्या संपत्तीचा वापर व्यापार , उद्योगासाठी होईल व देशाचा आर्थिक विकास घडून येईल.
                      स्मिथ यांना व्यवहारातील व्यापारातील हस्तक्षेप मान्य नव्हता . सरकारने काही महत्त्वाची कार्ये देशाच्या व समाजाच्या हिताच्या दृष्टिने आपल्याकडे ठेवावीत व बाकीच्या सर्वच क्षेत्रामध्ये व्यक्तीला स्वातंत्र्य द्यावे . संरक्षण कायदा व सुव्यवस्था , रस्तेबांधणी इत्यादी कार्य सरकारकडे असावीत.
                   ज्यावेळी व्यक्तीगत स्वार्थापोटी मक्तेदारी निर्माण करण्याचा प्रयत्न व्यक्तीकडून होईल तेंव्हा ती मक्तेदारी दूर करण्यासाठी मक्तेदारीविरुद्ध कायदे करणे , बँक निर्मित चलन , व्याजदराचे नियंत्रण , सक्तीचे प्राथमिक शिक्षण इत्यादी बाबतीत स्मिथने सरकारच्या हस्तक्षेपाचे समर्थन केले . तर देशाचा व्यापार हा मुक्त स्वरूपाचा असावा त्यावर कसल्याच प्रकारचे बंधन नसले पाहिजे . म्हणूनच त्यांनी आर्थिक विकासाच्या कार्यामध्ये निर्हस्तक्षेपाच्या धोरणाचा पुरस्कार केला आहे. 

( ३ ) श्रमविभाजन ( Division of Labour )

 अॅडम स्मिथ यांच्या आर्थिक विवेचनात श्रमविभाजनाला अधिक महत्व आहे . त्यांच्या मते श्रमविभाजनाच्या तत्वामुळे उद्योगसंस्थेत मोठ्या प्रमाणात उत्पादन होते . अनेक कामे एका व्यक्तीकडून करून घेण्यापेक्षा एका व्यक्तीला एकच काम दिले तर तो त्या कामात कुशल बनेल , त्यामुळे उत्पादन व्यवस्था प्रगत होईल . त्यातून उत्पादन खर्च घटतो , वस्तूचा दर्जा सुधारतो व वस्तूचे एकत्रित परिमाण वाढून आर्थिक विकास आपोआप घडून येतो . श्रमिकाने एखाद्या वस्तुच्या एकाच भागाच्या उत्पादनावर अधिक लक्ष दिल्यास त्यामध्ये तो तबैज अथवा वाकबगार बनतो . कमी वेळेमध्ये अनेक सुट्या भागाचे उत्पादन करू शकतो . अधिक उत्पादन होण्यास मदत होते . देशांतर्गत वस्तुचा साठा पुरवठा वाढतो .
 देशात पुरेशी मागणी नसेल तर परदेशातही निर्यात केले जाईल यालाच स्मिथ यांनी ' मानवी स्वभावातील विनिमयाची नैसर्गिक प्रवृत्ती असे संबोधले आहे . श्रमविभागणीमध्ये एका वस्तुच्या निर्मितीचे काम अनेक विधेमध्ये वाटले जाते . त्यामुळे कमी खर्चात वस्तुची निर्मिती होते . वेळेची बचत होते . उत्पादकतेत वाढ होते . राष्ट्रीय उत्पन्न वाढते . रोजगार व वेतनात वाढ होते . लोकसंख्या वाढते . लोकसंख्या वाढल्याने बचत वाढते तर दुसऱ्या बाजूने वस्तुची मागणी वाढते . पुन्हा श्रमविभागणीच्या तत्वाचा वापर करून अधिक उत्पादन करता येते व मागणी आणि पुरवठ्यात संतुलन साधता येते . बहिर्गत बचतीचे फायदे मिळतात . उत्पादन खर्च कमी होतो . नफ्याचे प्रमाण वाढते . गुंतवणूकीस प्रोत्साहन मिळते . अशा प्रकारे श्रमविभाजनामुळे आर्थिक विकासाची प्रक्रिया गतीशील बनते व देशाचा आर्थिक विकास घडून येतो . म्हणून अॅडमस्मिय यांनी श्रमविभागणीच्या तत्वाचा पुरस्कार केला आहे . 

( ४ ) भांडवल संचय ( Capital Accumulation )

 अॅडमस्मिथ यांनी आर्थिक विकासामध्ये भांडवल संचयावर व बचतीवर अधिक भर दिला आहे . त्यांच्या मते ज्या अर्थव्यवस्थेमध्ये भांडवल संचय अधिक असेल अशा अर्थव्यवस्थेत नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य प्रमाणात वापर होतो व आर्थिक विकास घडून येतो . म्हणजे भांडवल संचय हा आर्थिक विकासातील प्रमुख घटक आहे असे स्मिथनी प्रतिपादन केले आहे . परंतु हा भांडवल संचय कसा होतो . याचे स्पष्टीकरण स्मिथ यांनी पुढील प्रमाणे केले आहे . भूमी , श्रम , भांडवल , संघटन व तंत्रज्ञान ह्या सर्वच घटकाला स्मिथने महत्त्व दिले आहे . भांडवलदार , जमिनदार बचत करू शकतात पण श्रमिक मात्र बचत करू शकत नाही . कारण श्रमिका मिळणारा मोबदला म्हणजे मजुरी ही निर्वाह पातळी इतकी असते . म्हणून तो आपले सर्वच उत्पन्न उपभोगावर खर्च करतो . त्यामुळे त्याच्या उत्पन्नाचा हिस्सा शिल्लक राहू शकत नाहीत . म्हणून श्रमिक वर्ग बचत करू शकत नाही .
 वेतनाचा दर कमी असल्यामुळे उत्पादनाचा सरासरी खर्च कमी , त्यामुळे वस्तुची किंमत कमी आकारून अधिक विक्री करून , अधिक नफा कमविण्याचे कार्य भांडवलदार करित असतो . भांडवल संचय करू शकतो . जेवढा भांडवल संचय अधिक तेवढा देशाचा आर्थिक विकास अधिक होतो .
 त्यामुळे देशाच्या विकासासाठी भांडवल संचयाचा दर नेहमी वाढता असावयास पाहिजे असे अॅडमस्मिथ यांचे मत होते . अॅडमस्मिथ यांनी बदलता व्याजाचा दर भांडवल संचयावर परिणाम करतो याचेही स्पष्टीकरण केले आहे . थोडक्यात देशामध्ये बचत करण्याचे कार्य फक्त भांडवलदार करीत असतो . त्यामुळे भांडवल संचय देखील (अधिक होतो . अधिक संचय आर्थिक विकासास सहाय्यभूत ठरते . 

 ५ ) आर्थिक विकासाची प्रक्रिया 

अधिक होतो . अधिक संचय आर्थिक विकासास सहाय्यभूत ठरते . अॅडम स्मिथ यांच्या मते आर्थिक विकासाची प्रक्रिया स्वयंचलित असते . त्यामुळे कोणी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही . श्रमविभाजन व विशेषीकरणामुळे उत्पादन वाढते . त्यामुळे उत्पन्न वाढून मागणी वाढते . त्यामुळे पुन्हा उत्पादनात वाढ होते . अशी ही प्रक्रिया सतत चालू असते . अॅडमस्मिथच्या मते आर्थिक विकास ही स्वतःच्या गतीने पुढे जाण्याची प्रवृत्ती असते . तसेच ती अविरतपणे चालणारी प्रक्रिया आहे . तसेच ती संचयी स्वरूपाची प्रक्रिया आहे . विकासास सुरुवात झाली म्हणजे भांडवलाचा साठा वाढतो , रोजगारात व वेतनात देखील वाढ होते . 
उत्पन्न वाढते . त्यामुळे औद्योगिक विकासाला प्रेरणा मिळते.
 देतनात वाढ झाल्यामुळे लोकसंख्या वाढून भागणीत वाढ होते . बाह्य बचतीचा लाभ मिळून कमीत कमी खर्चात अधिक उत्पादन केले जाते . त्यामुळे अधिक विक्री होऊन नफ्याचे प्रमाण वाढते वाढत्या नफ्याचा वापर पुढे उत्पादनात व संशोधनात करण्यात येतो . उत्पादन यंत्रात सुधारणा घडून आणली जाते . अशा रितीने एकदा विकासास सुरुवात झाले म्हणजे पुढे आपोआप त्याच गतीने सुरू राहतो . असेच दिर्घकाळ चालत राहिले म्हणजे देशाचा सर्वागिण विकास होण्यास फार विलंब लागत नाही. 

( ६ ) स्थैतिक अवस्था ( Static state ) . -

 आर्थिक विकासाची प्रक्रिया सतत चालू राहते व त्यात उत्तरोत्तर वाढ होत जाईल ; पण याचा अर्थ असा नाही की आर्थिक विकास अमर्याद होईल . म्हणून अॅडम स्मिथ म्हणतो अर्थव्यवस्थेत स्थैतिक अवस्था येते . त्यानंतर कितीही प्रयत्न केले तर उत्पादन , उत्पन्न वाढविणे शक्य नसते . 
त्यामुळे कांही काळ जावू द्यावा लागतो . त्यानंतर पुन्हा विकासाला सुरूवात होते . अशा प्रकारची स्थैतिक अवस्था असते . याची जाणीव त्यांनी करून दिली . थोडक्यात वरील अनेक विचाराच्या एकत्रीकरणाला अॅडम स्मिथ यांचा आर्थिक विकासाचा सिध्दांत म्हणतात.
 टीका : 
                 अॅडम स्मिथ यांच्या आर्थिक विकासाच्या सिध्दांतावर खालील प्रमाणे टीका केलेली दिसून येते . 
  •  पूर्ण स्पर्धेचे गृहीत अवास्तव . 
  • निर्हस्तक्षेपाच्या धोरणावर हस्तक्षेप . 
  • प्रत्येक व्यक्तीला स्वहित समजतेच असे नाही . 
  •  आर्थिक विकासात भांडवलाला आवश्यकतेपेक्षा अधिक महत्व दिले . 
  •  अर्थव्यवस्थेत स्थैतिक अवस्था नसते .

अॅडम स्मिथच्या आर्थिक विकासाच्या सिध्दांताचे टीकात्मक परिक्षण करा.
अॅडम स्मिथच्या आर्थिक विकासाच्या सिध्दांताचे टीकात्मक परिक्षण करा.


                        

Comments

Popular posts from this blog

Health and physical education -आरोग्य व शारीरिक शिक्षण Class 12th Project download

Environment education and water security - पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा Project 11th and 12th Class Project Download in PDF

Health and physical education class 12 solutions maharashtra board download in pdf in English